ईतर

ज्यांनी सहकारी कारखाना खाजगी केला ते आज सहकार वाचवण्याची भाषा करतात – विश्वराज महाडिक

संवाद परिषदेवेळी प्रत्येक गावात सभासद शेतकऱ्यांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

संपादक-दिनेश खंडेलवाल

ज्यांनी सहकारी कारखाना खाजगी केला ते आज सहकार वाचवण्याची भाषा करतात – विश्वराज महाडिक

संवाद परिषदेवेळी
प्रत्येक गावात सभासद शेतकऱ्यांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरपूर: भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून कारखान्याचे चेअरमन तथा राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक यांनी या कारखाना निवडणुकीत आपला अग्रेसर सहभाग नोंदवून ते प्रचारफेरीच्या माध्यमातून प्रत्येक गावोगावी जात शेतकरी सभासद यांच्या भेटीगाटी घेऊन त्यांना भिमा शेतकरी आघाडी पॅनलच्या सर्व उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.

नुकताच ऊस संवाद परिषद दौरा सुरू असून कातेवाडी गावांमध्ये युवा नेते विश्वराज (भैय्या)महाडीक यांनी दौरा प्रसंगी कातेवाडी गावातील जेष्ठ सभासदांंशी चर्चा करून संवाद साधला दरम्यान त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.

यावेळी बोलतांना सांगितले की संस्थेविषयी विरोधाला विरोध म्हणून विरोधक खोटेनाटे आरोप करत संस्थेला बदनाम करत असून लोकशाहीत निवडणुका येत असतात जात असतात परंतु ज्या कारखान्याचा आपल्या जीवनात खारीचा वाटा आहे त्या कारखान्यास विरोध? फक्त सत्तेसाठी बदनाम करत आहेत.

ज्या विरोधकांनी एक शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी साखर कारखाना खाजगी करून आपल्या स्वताच्या मालकीचा केला ते आज चौकात सभा घेऊन सहकार वाचले पाहिजे अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत. यापेक्षा मोठे दुर्दैव काय? असा प्रश्न विश्वराज महाडिक यांनी विरोधकांसमोर उपस्थित केला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close