सामाजिक

ज्योतिष व सामाजिक “कार्य गौरव” पुरस्कार राधेश बादले पाटील यांना जाहीर

चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ संस्थेचे "कार्य गौरव" व "पद्माश्री पुरस्कार" जाहीर

संपादक – दिनेश खंडेलवाल 

ज्योतिष व सामाजिक “कार्य गौरव” पुरस्कार राधेश बादले पाटील यांना जाहीर

चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ संस्थेचे “कार्य गौरव” व “पद्माश्री पुरस्कार” जाहीर

पंढरपूर(प्रतिनिधी):- ग्रहांचे परिणाम जीवसृष्टीवर होत नाही असं म्हणत असलेल्या वैज्ञानिकांसह अंनिसला, पृथ्वीवरील समुद्राला चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे येत असलेल्या भरती-ओहोटीबाबत व सुर्यप्रकाशाच्या प्रकाशसंश्लेषणामुळे होत अन्ननिर्मितीबाबत उलटसुलट प्रश्न विचारुन वैज्ञानिक सिद्धांत खोटे ठरविण्यात तरबेज असलेल्या, तसेच सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था वाचवण्यासाठी यथोचित प्रयत्न करित असलेल्या पंढरपूरचे राधेश बादले पाटील यांना महाराष्ट्रात प्रतिष्ठीत असलेला “कार्य गौरव” पुरस्कार रत्नागिरी येथील चैतन्य ज्योतिष मंडळाने जाहीर केला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रसन्न मुळ्ये यांनी दिली आहे. तर “पद्माश्री पुरस्कार” नाशिकच्या शुभांगिनी पांगारकर यांना जाहीर झाला आहे.

ज्योतिष संशोधन क्षेत्रात कार्यरत असलेल्या रत्नागिरी येथील श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ हे दरवर्षी ज्योतिष व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र राज्यात प्रतिष्ठित समजला जाणारा कार्यगौरव पुरस्कार व पद्माश्री पुरस्कार देत असते. सालाबादप्रमाणे याही वर्षी संस्थेने कार्यगौरव व पद्माश्री पुरस्कार जाहीर केले आहेत. कार्य गौरव पुरस्कार जाहीर झालेले राधेश बादले पाटील यांचे ज्योतिष संशोधन क्षेत्रासह सामाजिक कार्य बहुमोल असुन, वैज्ञानिक मताला वैज्ञानिक सिद्धांतानेच चोख प्रत्युत्तर देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून राधेश बादले पाटील हे ओळखले जातात. कुंडलीवरुन स्त्री -पुरुष आहे का? जिवंत मृत आहे का? असे विचारणार्‍यांना राधेश बादले पाटील विचारतात की रक्ताच्या नमुन्यावरुन या पश्नांची उत्तरे द्या. ज्योतिष संशोधनातील १८ संशोधक ऋषीमुनींनी अंतराळातील अनेक तारा मंडळ शोधली, त्यातील फक्त पृथ्वीवर परिणाम करणार्‍या तारा मंडळाला २७ नावे देऊन नक्षत्र अशा नामकरणासह पृथ्वीवर जन्मलेल्या मनुष्याला जन्मनाव देऊन, परिणाम अधोरेखित करण्याचे महत्त्व कार्य केले आहे.मात्र आधुनिक वैज्ञानिक हे अज्ञानापोटी चिकीत्सेशिवाय भंपक विधाने करून, ज्योतिषशास्त्राला बदनाम करण्याचे कटकारस्थान करतात, हि बाब दुर्दैवी असल्याचे परखड मत राधेश बादले पाटील नोंदवतात.

राधेश बादले पाटील यांचे सामाजिक व धार्मिक योगदान मोठे आहे. रुढीपरंपरेतील विज्ञान, संत गाडगेबाबांचे पुरोगामीत्व, साळसुदपणातील दांभिकता, सार्वजनिक संस्थांमधील भ्रष्टाचार, आदि अनेक क्षेत्रांमध्ये राधेश बादले पाटील यांनी कार्य केले आहे. तसेच राधेश बादले पाटील यांनी नारीपाठ, दिवाणी (स्त्रीभ्रूणहत्येवरील लावणी संग्रह), राधेश हायकू, आयुर्पाठ, वैज्ञानिक अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज, ज्योतिषशास्त्राची शस्त्रक्रिया, नक्षत्र व आयुर्वेद, धडा राजकारणाचा, राधेश गीता आदि पुस्तकांचे लेखन केले आहे. सामाजिक, धार्मिक,शैक्षणिक, साहित्यिक, ज्योतिष, वास्तू, शेती, पत्रकारीता, आदि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राधेश बादले पाटील यांचा गौरव होत असतो.

नाशिक येथील शुभांगिनी पांगारकर यांनी ज्योतिष क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पद्माश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती ज्योतिष संशोधन विद्यापीठाचे कुलपती व चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ प्रसन्न मुळ्ये यांनी दिली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close