सामाजिक

पशुपालन व दुग्ध व्यवसायातून होते लाखोंची कमाई- अरविंद पाटील 

भारत कृषी महोत्सवात अरविंद पाटील यांनी केले दुग्ध व्यवसायिकांना मौलिक मार्गदर्शन

संपादक-दिनेश खंडेलवाल

पशुपालन व दुग्ध व्यवसायातून होते लाखोंची कमाई- अरविंद पाटील 

भारत कृषी महोत्सवात अरविंद पाटील यांनी केले दुग्ध व्यवसायिकांना मौलिक मार्गदर्शन

पंढरपूर : वाढत्या बेरोजगारीमुळे आणि शेतकऱ्याची पीके हातातून जाऊ लागल्याने शेतकरी व तरुणाई समोर पशुपालनाचा व्यवसाय करून लाखो रुपये मिळवण्याची संधी उपलब्ध असून हा व्यवसाय कशा पद्धतीने केला पाहिजे. पशू पालनासाठी कोणती काळजी घ्यावी, काय करावे, खाद्य कोणते असावे याबाबत मौलिक मार्गदर्शन केले.

लोकनेते स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त भारत कृषी महोत्सवाचे आयोजन पंढरपूर येथील रेल्वे मैदानावर करण्यात आले आहे. आज २६ फेब्रुवारी २०२४ रोजी महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी पशुपालन व दुग्ध व्यवसाय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाय.टी. पाटील डेअरी फार्मचे पशुधन सल्लागार अरविंद यशवंत पाटील यांनी दुग्ध व्यवसाय तरुणांना एक नवी दिशा या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने युवक, दुग्ध व्यवसायिक, शेतकरी उपस्थित होते.

प्रारंभी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ दादा भालके यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यातील नानीबाई चिखली येथील अरविंद पाटील यांनी बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर पुढे दूध व्यवसाय सुरू केला.
सुरुवातीला पहिल्या वेताच्या पाच गाई आणल्या. त्यानंतर पैदास वाढवत जनावरांची संख्या सव्वाशे पर्यंत कशी नेली. सध्या त्यांच्याकडे गाई, कालवड, पंढरपुरी म्हैस, होलस्टिन फ्रीजियन एचएफ जातीच्या गाई, जातिवंत वळू, यासह अनेक जनावरे आहेत. या व्यवसायातून कशाप्रकारे ते यशस्वी झाले याची सविस्तर माहिती दिली.

यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पशू गोठ्याची आदर्श उभारणी कशी करावी तसेच विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी जनावरांच्या पायाखाली रबरि मॅट टाकावे, उन्हाळ्यात चाळीस अंशापर्यंत तापमान गेले तर तापमान नियंत्रणासाठी फॅगर सिस्टीम यंत्रणा कार्यान्वित करावी. दूध काढणीसाठी मिल्किंग मशीनचा वापर करावा, दिवसाचे दूध संकलन कसे करावे, मजूर खर्च वाचवण्यासाठी कमी खर्चात कापणी यंत्राचा वापर करावा, वर्षभर पुरेल इतका चारा तयार करून गरजेनुसार वापर कसा करावा, जनावरांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे या उद्देशाने नियोजन कसे करावे, कृत्रिम रेतन, वेळीच लसीकरण कसे करावे, पशुखाद्य, व्यवस्थापन, औषधे, जनावरांच्या नोंदी, माजाचा काळ याविषयी सविस्तर आणि मौलिक माहिती दिली.

या चर्चासत्रांनंतर पशुपालक व्यावसायिक आणि युवकांनी आपल्याला महत्त्वाची व अत्यंत उपयोगी पडणारी अशी माहिती या चर्चासत्रातून मिळाल्याचे सांगत भारत कृषी प्रदर्शनाचे आयोजन केलेले नेते भगीरथ दादा भालके यांचे आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close