सामाजिक

स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पंचायत समीतितच महिलांची कुचंबना

महिला कर्मचार्‍यांसह अधिकाऱ्यांनी घेतली गांधारी भूमिका

संपादक-दिनेश खंडेलवाल

स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पंचायत समीतितच महिलांची कुचंबना

महिला कर्मचार्‍यांसह अधिकाऱ्यांनी घेतली गांधारी भूमिका

स्वतंत्र शौचालय नसल्याने महिलांना सहन करावा लागतोय नाहक त्रास

स्वच्छतागृह असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था

दिनेश खंडेलवाल/पंढरपूर:-
पर्यावरणाची स्वच्छतेची वारी पंढरीच्या दारी म्हणत देहू आळंदीहून पंढरपूर पर्यंत येणाऱ्या सर्व पालख्या मध्ये स्वच्छते बाबत प्रबोधन केले जाते. प्रशासनाकडून ही स्वतंत्र वारी पंढरपुरात आल्यानंतर येथील पंचायत समितीमध्ये त्याचा समारोप होतो. परंतु याच पंचायत समितीमध्ये असलेल्या स्वच्छतागृहाची दुरावस्था झाल्यामुळे महिला वर्गाची मोठी कुचंबना होत आहे. एकीकडे प्रशासन स्वच्छतेच्या प्रबोधनासाठी मोठा निधी खर्च करत असतानाच दुसरीकडे मात्र निधी येऊनही स्वच्छतेची दुरावस्था पाहायला मिळते. या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहात तसेच परिसरात घाणीचे साम्राज्य, दुर्गंधी, पाण्याचा दुष्काळ, अस्वच्छतेने व्यापले आहे. पंचायत समिती मध्ये असलेले महिला कर्मचारी व अधिकार्यांनी याबाबत गांधारिची भूमिका घेतली असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
पंचायत समितीच्या आवारात असलेले स्वच्छतागृह म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशा अवस्थेत असल्याने महिला वर्गातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.

पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातून तसेच शहरातील विविध भागातून कामानिमीत्त शहर व ग्रामीण भागातील महिला भगिनी येत असतात. परंतु या ठिकाणी शेकडो महिलांना स्वच्छतागृहाची पुरेशी सोय नसल्याने मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान पंचायत समितीकडून गेल्या अनेक वर्षात याबाबतीत कोणतेही ठोस पावले उचलली जात नसल्याने केवळ दिखाव्या साठी स्वच्छता दिंडी समारोपात प्रबोधन केले जाते का? असा प्रश्न महिला वर्गातून उपस्थित केला जात आहे.

पंढरपूर पंचायत समिती ही श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानामुळे संपूर्ण राज्यभरातून येणाऱ्या भाविक भक्तांना परिचीत असलेली पंचायत समिती आहे. या पंचायत समिती मध्ये आषाढी तसेच कार्तिकी वारीच्या दरम्यान स्वच्छता दिंडीच्या मार्फत थेट मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिंडीचा समारोप करून संपूर्ण राज्यभरातील भाविक भक्तांसाठी स्वच्छतेचा संदेश दिला जातो. तसेच स्वच्छतेच्या कामांसाठी दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा खर्चही केला जातो. तर दुसरीकडे मात्र पंचायत समितीच्या दुर्लक्षामुळे येथे कामासाठी येणाऱ्या शेकडो महिलांना स्वच्छतागृहाची पुरेशी सोयच नसल्याने मोठी कुचंबना व त्रास सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जातो.

पंचायत समितीच्या पाठीमागील बाजूस पुरुषांसाठी मुतारीची तसेच स्वच्छतागृहाची सोय आहे. मात्र महिलांसाठी केवळ एकच स्वच्छतागृह (शौचालय) असून तेही जीर्ण व बंद अवस्थेत असलेले दिसून येत आहे. त्यामुळे महिलांची होणारी ही गैरसोय पंचायत समिती कधी थांबवणार आहे. आता तरी या प्रश्नाकडे पंचायत समिती मधील वरिष्ठ अधिकारी, संबंधित अधिकारी लक्ष देतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

[ स्वच्छतेसाठी वर्षा शिंदे यांनी दिला इशारा….

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा वर्षाताई शिंदे यांनी पंचायत समिती मधील स्वच्छतागृह व परिसरातील सर्व ठिकाणाची पाहणी करून गटविकास अधिकारी यांना भेटून निवेदन दिले. यामध्ये येणाऱ्या आषाढी सोहळ्याच्या अगोदर स्वच्छतागृहाबाबत सर्व सुविधा महिलांसाठी उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्षा अॅडवोकेट सुकेशिनी बागल, तालुका उपाध्यक्षा रूपाली रंधवे, रेखा यादव, तालुका सदस्या वर्षा भोसले आदी महिला भगिनी उपस्थित होत्या. ]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close