ईतरसामाजिक

नामदेव पायरी नजीकचे स्वच्छतागृह केव्हा सुरू होणार! अ.भा.ग्राहक पंचायतीचा नगरपालिकेला सवाल

इमारत बांधली,फलकही रंगवले मात्र आजही महिला भाविकांची होतेय गैरसोय!

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिरा समोरील नामदेव पायरी नजीक असलेले स्वच्छतागृह केव्हा सुरु होणार? अशी विचारणा अ.भा ग्राहक पंचायतीने नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती जिल्हा संघटक शशिकांत हरिदास यांनी दिली.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने शासनाने राज्यातील सर्व मंदिरे खुली केली आहेत.

त्याप्रमाणे पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरही सर्वांसाठी खुले झाले आहे. त्यामुळे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत. मंदिर परिसरात कोठेही स्वच्छतागृह सुरू नसल्याने आलेल्या भाविकांची मोठी अडचण होत आहे. विशेषकरुन महिला वर्गाची मोठी अडचण व कुचंबणा होत आहे.

ही अडचण लक्षात घेऊन भाविकांच्या सोयीसाठी नामदेव पायरी नजीकचे (दर्शन मंडपासमोरील) स्वच्छतागृह बांधले आहे. त्यावर मोठ्या अक्षरात महिलांसाठी, पुरुषांसाठी असे फलकही रंगवलेले आहेत. फलक पाहून आलेले भाविक तिथपर्यंत पोहोचतात मात्र गेटवर लावलेले कुलुप व मागील बाजुस शटरला लावलेले कुलुप पाहून नाराजी व्यक्त करत निघून जातात.
अनेक महिन्यांपासून बांधून पुर्ण असलेले हे स्वच्छतागृह सुरु करण्यासाठी काय अडचण आहे. मान्यवरांकडून उदघाटनासाठी थांबले आहेत काय हेही समजत नाही. यात भाविकांना विशेषतः महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेले व सध्याबंद असलेले स्वच्छतागृह तात्काळ सुरू करण्यात यावे. अशी मागणी प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा अध्यक्ष विनोद भरते, कोषाध्यक्ष सुहास निकते,जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य नंदकुमार देशपांडे, तालुकाध्यक्ष अण्णा ऐतवाडकर, संघटक विनय उपाध्ये यांनी केली आहे.

विठ्ठल मंदिरात दर्शनाला आलेल्या महिला भाविकांना आजवर कोणतेही स्वच्छतागृह या परिसरात नसल्याने त्यांची मोठी कुचंबना होताना दिसते. नगरपरिषदेने येथील जागेचा योग्य वापर करून त्या ठिकाणी नव्याने स्वच्छतागृह बांधले खरे परंतु ते अद्यापही बंद असल्याने अनेक वेळा तिथपर्यंत गेलेल्या महिला निराश होऊन संतापाने माघारी येतात व त्यांची होणारी कुचंबणा पाहता नगरपरिषदेने लवकरात लवकर या ठिकाणचे स्वच्छतागृह सुरू करावे अशी मागणी महिला भाविकांतून करण्यात येत आहे. हे स्वच्छतागृह सुरु केल्याने विशेषतः महिला भाविकांची गैरसोय दुर होईल. असेही पत्रात नमूद केले आहे.

बातमी व जाहिरात साठी संपर्क-                दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close