राजकिय

माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांची ठोकशाही चालू देणार नाही-देवेंद्र फडणवीस

३६ गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी निंबाळकरांना विजयी करा फडणवीसांचे आवाहन

संपादक-दिनेश खंडेलवाल 

माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांची ठोकशाही चालू देणार नाही-देवेंद्र फडणवीस

३६ गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी निंबाळकरांना विजयी करा फडणवीसांचे आवाहन

पंढरपूर : माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांची ठोकशाही चालू दिली जाणार नाही. या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मी मुक्त करणार आहे. या ठिकाणी सामान्य माणसाला जो त्रास आहे. ज्यांच्या जमिनी बळकावल्या गेल्या, ज्या लोकांवर हल्ले झाले, त्या लोकांना प्रतारित केले आहे. हे सहन केले जाणार नाही ही लोकशाही आहे ठोकशाही नाही म्हणत त्यांचा दहशतवाद मोडून काढणार असून विरोधी उमेदवाराचे सर्व गुन्हे उघड करणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी भर सभेत दिला.

माढा लोकसभा मतदार संघातील
भाजपचे उमेदवार खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी भाषण करताना विरोधी उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना इशारा दिला.

फडवणीस म्हणाले खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षात चांगले काम केले आहे. लोकसभा मतदारसंघातील रखडलेले प्रश्न निंबाळकरांनी मार्गी लावले. यामध्ये नीरा देवधरचा पाणीप्रश्न, पंढरपूर-फलटण रेल्वे, फलटण- बारामती रेल्वे यासह रस्ते, पालखी मार्ग या कामाचा विकास केला आहे. यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. येथील ३६ गावाचा पाण्याचा प्रश्न बाकी आहे. हे पाणी मोदी यांच्या माध्यमातून पोहोचवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी ग्वाही दिली.

माढा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांना पाठिंबा मिळत आहे. खा. शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील प्रचारात उतरले आहेत. ते म्हणतात पुढील पिढीच्या भविष्याकरता ३० वर्षांनी आम्ही तिघे एकत्र आलो आहोत. परंतु पुढील पिढी म्हणजे तुम्ही नाही तर ते त्यांच्या स्वतःच्या पिढीसाठी बोलत आहे व त्यांच्या भविष्यासाठी ते एकत्र आले आहेत. असेही फडणवीस म्हणाले पुढे बोलताना सांगितले की जनता सुज्ञ आहे. खा. निंबाळकर यांनी केलेली विकासकामे जनता विसरणार नाही. त्यांना पुन्हा एकदा दिल्लीला पाठवा या तालुक्याचा विकास करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी जनसमुदया समोर दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close