ईतरशैक्षणिक

तब्बल वीस वर्षांनंतर पुन्हा भरली आठवणींची शाळा

आश्रमात राहिलेली मुले, मुली विविध क्षेत्रातून एकत्र आल्यामुळे समजला प्रत्येकाचा जीवनपट

संपादक – दिनेश खंडेलवाल 

तब्बल वीस वर्षांनंतर पुन्हा भरली आठवणींची शाळा

आश्रमात राहिलेली मुले, मुली विविध क्षेत्रातून एकत्र आल्यामुळे समजला प्रत्येकाचा जीवनपट

वाखरी(संतोष कांबळे):- पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे असणारी जवाहरलाल प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक आश्रमशाळा येथे इयत्ता १० वी २००५ मध्ये शिक्षण घेऊन आकाशात उंच भरारी घेतलेले विध्यार्थी तब्बल २० वर्षांनंतर माध्यमिक आश्रमशाळा वाखरी येथे परत एकत्र आले जे शिक्षक शिकवायला होते त्यांच्याबरोबर उपस्थित राहुन दहावीचा वर्ग भरवला अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत आणि एकमेकांशी असलेले ऋणानुबंध आणि मैत्रीचे नाते घट्ट ठेवण्याचा निर्धार केला. दरम्यान वीस वर्षांनंतर पुन्हा भरली आठवणींची शाळा आणि सर्वजन भाराऊन गेले.

शिक्षकांनी अनेक मोलाचे आणि आवश्यक मार्गदर्शन करुन प्रत्येक वर्षी गेट टुगेदर घेणे का गरजेचे आहे याचे कारण म्हणजे वर्षभरात अनेक सुख दुःख अडी अडचणी येत असतात त्या एकमेकांच्या संपर्कामुळे सोडवण्यास मदत होते असे सांगतच बिस्किटे सर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाष्टा चहापाणी तसेच दुपारी जेवणाचे नियोजन करण्यात आले होते. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना फेटे शाल व शाळेची आठवण म्हणून गिफ्ट देण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अतिशय मनमिळाऊपणे कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

गेट-टुगेदरमुळे अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि मनसोक्त गप्पा मारल्या. प्रत्येकाने आपापल्या आयुष्यातील सुखदुःख, यश आणि अनुभव एकमेकांसोबत वाटून घेतले. काही जण अनेक वर्षांनी भेटल्यामुळे भावनिक झाले होते, तर काहींनी आपल्या शालेय जीवनातील किस्से सांगून सर्वांना हसण्यास भाग पाडले.

यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या दिवसांची आठवण म्हणून सामूहिक फोटो काढले. तसेच, काही विद्यार्थ्यांनी आपले अनुभव आणि पुढील वाटचाल कशी असावी याबद्दल विचार मांडले. या स्नेहसंमेलनातून जुनी मैत्री अधिक घट्ट झाली आणि नवीन ऊर्जा मिळाली, असे मत अनेकांनी व्यक्त केले. भविष्यातही अशाच प्रकारे नियमितपणे भेटण्याचे आणि एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे वचन विद्यार्थ्यांनी यावेळी दिले.या कार्यक्रमामुळे जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीचा आनंद तर मिळालाच, पण त्याचसोबत शाळेच्या सुंदर दिवसांची आठवणही ताजी झाली.

गुरुवर्य मोरे सर, बिस्किटे सर ,मस्के सर,पोरे सर, पवार सर,जाधव सर,बी. वाय. कांबळे सर, इंगोले सर,धनवे सर , चव्हाण सर,सुजित कुमार कांबळे सर, यांचा सर्व २००५ च्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी आदरपूर्वक सम्मान केला आणि हा ग्रुप फक्त सोशल मीडिया पुरता मर्यादित न ठेवता ग्रुपच्या माध्यमातून समाजहीताची कामे करण्याचा निर्धार केला यातुन सामाजिक, शैक्षणिक,क्रीडा,निसर्ग संवर्धन आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी उभे राहण्याचा सर्वांनी विश्वास दिला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close