राज्यसामाजिक

वारी कालावधीत भाविकांच्या हितार्थ कार्य करणारा अधिकारी

मंदिर संवर्धनाच्या अनुषंगाने धोरणात्मक कार्य पुढील काळात होणार

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : वैष्णवांचे माहेरघर असलेल्या पंढरपुरातील सावळया विठुरायांच्या मंदिराचा सर्वकंष विकास आराखडा तयार करावा यासाठी प्रांताधिकारी तथा श्री विठठल रूक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांचे प्रयत्नातून यशस्वी ठरले आहे. यातून लवकरच भाविकांच्या हितार्थ आणि पुरातन मंदिर संवर्धनाच्या अनुषंगाने धोरणात्मक कार्य पुढच्या काळात होत आहे.

पंढरपूर हे राज्यातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहे. येथील आषाढी यात्रेच्या निमित्ताने मोठया संख्येने भाविक येत असतात. अशा वेळी भाविकांच्या सुविधांची काळजी घेण्याचे काम प्रशासनावर असते. मुख्यत्वेकरून भाविक हा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये जातो. त्यामुळे साहजिकच मंदिरामध्ये येणा-या भाविकांना आध्यात्मिक प्रसन्नतेसमवेत विकासात्मक परंतु सुविधांची प्रसन्नता लाभावी. या अनुषंगाने मंदिर समितीला प्रयत्न करावे लागतात. यामध्ये प्रामुख्याने मंदिर समितीच्या निर्णयासह प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांची जबाबदारी आणि कर्तव्ये मोलाची ठरत अधोरेखित होतात. परिणामी मंदिराचा पुरातत्व विभागाकडून होणारा सर्वकंष विकास आराखडा प्रशासकीय पातळयावरून पास करून भाविकांच्या हितार्थ आगामी काळात राबवण्यासाठीचे कार्य हे गुरव यांच्यकडून होत आहे.

याशिवाय यंदाच्या वारीचे वेशिष्टय म्हणजे दोन वर्षानंतर वारी होत आहे. त्याअनुषंगाने शासकीय कर्मचारी,मंदिरे समितीचे कर्मचारी यांच्याकडून येणा-या भाविकांशी सुसंवादातून वारी पूर्ण व्हावी. वारकरी सांप्रदायिक संत परंपरेनुसार भाषेतील माधुर्य यावे. याचा विचार करून गुरव यांच्या प्रयत्नातून नुकतेच या सर्वांना शासनाच्या अधिकृत अशा यशदा संस्थेकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे.

दरम्यान यात्रा काळातील आपत्ती व्यवस्थापनासाठी काही महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना देखिल प्रशिक्षण देत यात्रोसाठी प्रशिक्षित करण्याचे काम केले आहे. याशिवाय चंद्रभागेच्या नदीमध्ये स्नान करताना. भाविकांचे संरक्ष्ण करण्यासाठी शहरातील अनुभवी होडीचालक आणि स्विंमर यांच्या माध्यमातून जल सुरक्षेची तयारी देखिल पूर्ण करण्यात आली आहे.

भाविकांना एका क्लिकवर पंढरपूरची माहिती व्हावी प्रशासनाकडून उपलब्ध सोयी सुविधांची माहिती व्हावी यासाठी प्रांताधिकारी कार्यालयाच्या वतीने व सिंहगड महाविद्यालयाच्या सहकार्यातून पंढरीची वारी हे ॲप बहुपयोगी असे या वारी पासून ठरणार आहे. त्यामुळे साहजिकच केवळ प्रशासकीय यंत्रणेतील नव्हे तर सामाजिक घटक, सामान्य नागरीक, महाविद्यालयीन विद्यार्थी अशा सर्वंच घटकांना एकत्र करत समाजाभिमुख प्रशासनाची पंढरीची वारी करण्याचे काम प्रातांधिकारी गजानन गुरव यांच्याकडून होत आहे.

लाडूप्रसाद कामाची प्रक्रिया व सोपानदेव महाराज पालखी सोहळ्यासाठी तात्पुरत्या नवीन पालखी तळास जागा देवून सर्व आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
मंदिरामध्ये आलेल्या भाविकांना दर्शनची व्यवस्था तसेच इतरही व्यवस्थाचे नियेाजन पंढरपूरचे प्रशासकीय प्रमुख म्हणून प्रांताधिकारी यांच्याकडे येते. विशेष् म्हणजे गजानन गुरव यांनी यांपूर्वी पंढरपूरचे तहसिलदार म्हणून काम पुर्वीचा अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे भूतकाळातील उणिवा आणि वर्तमानकालीन व भविष्यकालीन गरजांचा विचार करून यंदाच्या वारीचे नियोजन सुरु आहे.

तत्कालीन तहसिलदार म्हणून काम करत असताना त्यांच्या कार्यकालात तब्बल 99 दिवसांमध्ये विष्णुपद येथील बंधारा बांधून पूर्ण झाला. परिणामी सध्या संपूर्ण वाळवंटामध्ये चंद्रभागेचे पाणी पात्रामध्ये राहते. नदीपात्रात भाविकांना नित्याने स्नांनाचा लाभ घेता येतो. यांचे पुण्यकर्म तत्कालिन तहसिलदार म्हणून गजानन गुरव यांच्याकडे जाते.

यांदाच्या यात्रेमध्ये प्रांताधिकारी या नात्याने प्रशासकीय प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून मंदीर प्रशासनाचा प्रमुख तर पंढरपूर नगरपालिकेचे प्रशासक अशा तिहेरी जबाबदारीतून पंढरीची वारी अधिक सुकर आणि सफल संपुर्ण करण्याचा प्रयत्न गजानन गुरव यांच्याकडून होत आहे. कुठलाही अधिकारी लोकहित जपूण समाजाभिमूख कार्यकरण्यासाठी तत्पर असतो मात्र यासर्वामध्ये पंढरपूर येथे कार्यरत असताना पंढरपूरच्या नियोजनाचे काम प्रशासकीय चौकटीत राहून वारकऱ्यांच्या प्रथा परंपरा यांचा विचार करुन करावे लागते. त्यामुळे निश्चित जबाबदारी आणि कर्तव्यातून भाविकांचे पंढरपूरात हित साधले जात आहे हे महत्वाचे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close