काँग्रेस उमेदवार भगिरथ भालके यांच्या गावभेट दौऱ्यास स्वाभिमानी जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद
सामान्य जनतेच्या मनातील उमेदवार असल्याने मोठ्या मताधिक्यने विजयी होणार

संपादक – दिनेश खंडेलवाल
काँग्रेस उमेदवार भगिरथ भालके यांच्या गावभेट दौऱ्यास स्वाभिमानी जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद
सामान्य जनतेच्या मनातील उमेदवार असल्याने मोठ्या मताधिक्यने विजयी होणार
पंढरपूर(प्रतिनिधी):- २५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगिरथ दादा भालके यांच्या गावभेट दौऱ्यास मतदारसंघाच्या गावातील सर्व सामान्य नागरिक, युवा युवती, महिला शेतकरी वर्ग,व्यापारी व कै.भारत (नाना)भालके यांच्या स्वाभिमानी विचारांची जनता याचां उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी अनेक गावांत त्यांचे उत्साहात स्वागत करून औक्षण करण्यात आले.
यावेळी भगिरथ भालके यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, या मतदार संघातील स्वाभिमानी जनता आपला आशिर्वाद योग्य व स्वाभिमानी उमेदवाराला देऊन विजयी करतील. मी सर्व सामान्य जनतेच्या मनातील उमेदवार असुन विश्वासू व निष्ठावंत कार्यकर्ते, मतदार मला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला, यावेळी महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भगिरथ भारत भालके यांना मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील ग्रामस्थांच्या वतीने निवडणुकीकरिता ९ हजार ९९९/- रुपये देणगी देण्यात आली.
गावभेट प्रचार दौरा दरम्यान मुंढेवाडी,
तामदर्डी,तांडोर, सिद्धापूर,अरळी, नंदुर, डोणज, बोराळे या गावामध्ये जनतेशी त्यांनी आपली व पक्षाची भूमिका मांडली या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
[ स्वाभिमानी पंचसूत्री महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असता शेतकरी वर्ग,
महिला,युवा, युवती साठी बेरोजगार भत्ता, शैक्षणिक सुविधा, सर्व सामान्य नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, तसेच आरोग्य सेवा सुविधा,शेतकरी कर्जमाफी योजना, आरोग्य विमा योजना, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ,आदी योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मी स्वाभिमानी विचारांचे काम समाजात करणार असल्याचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगीरथ दादा भालके यांनी यावेळी सांगितले.]