राज्यसामाजिक

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने राबवण्यात येणारी मध्यान भोजन योजना पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे गावात सुरू

नेहरू युवा मंडळाच्या पुढाकाराने सुमारे ६५० कामगारांना मिळणार भोजनाचा लाभ

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे गावांमध्ये बांधकाम कामगार व इतर कामगारांसाठी शासनाच्या मध्यान भोजन योजना अंतर्गत आज ६५० कामगारांसाठी भोजन वितरित करण्यात आले. प्रारंभी गावचे सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते अजय नाना खांडेकर तसेच उपस्थित कामगारांच्या हस्ते मध्यान भोजनाचे नारळ वाढवून पूजन करण्यात आले. यानंतर विविध ठिकाणी जाऊन “सन्मान कष्टाचा आनंद उद्याचा” या ब्रीद वाक्याप्रमाणे कामगारांना दोन वेळेचे भोजन मिळावे यासाठी कामगार विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या योजनेतील भोजनाचे वाटप करण्यात आले.

भटुंबरे गावातील नेहरू युवा मंडळच्या माध्यमातून तसेच अध्यक्ष अजयनाना खंडागळे यांच्या पुढाकाराने ६५० जणांना मोफत जेवनाचा लाभ मिळवून देण्यात आला. तेही दोन्ही वेळेचे जेवन मिळणार आहे. यामुळे कामगार महिलांना जेवण बनवून कामावर जावे लागत होते. परंतु शासनाच्या या योजनेमुळे आता महिलांचे जेवन बनवण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. कष्टकरी कामगारांसाठी व दररोज काम करून आपली उपजीविका भागवणाऱ्या तळागाळातील कामगारांसाठी, जे शेतात काम करत असतील, वीटभट्टीवर काम करत असतील, रोजंदारीवर बांधकामाच्या कामाला जात असतील तसेच सेंटरींगचे काम करणारे,गवंडी काम करणारे अशा सर्व कामगारांसाठी महाराष्ट्र शासन कामगार विभागामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नावाने मध्यान्ह भोजन योजना मोफत राबवण्यात येत आहे.

या योजनेचा सर्वांना लाभ मिळेल. ही योजना कमीतकमी पाच वर्षे सुरू राहणार आहे. वीटभट्टीमजूरांना जागेवर जाऊन भोजन दिले जाणार आहे. याचा लाभ तळागाळातील कामगारां पर्यंत पोहोचणार आहे.

या जेवनामध्ये २० ग्रॅम भाजी,२० ग्रॅम दाळ, ५० ग्रॅम भात, दोन चपाती, गुळाचा खडा, लोणचे पाकीट असेल. शासनाच्या वतीने आपल्याला चांगल्या दर्जाचे मोफत जेवण तेही दोन वेळचे मिळत असल्याने उपस्थित कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

या योजने अंतर्गत कामगारांना अनेक सुविधा शासनाकडून दिल्या जातात त्यामध्ये विमा योजना कामगारांसाठी लागणारे साहित्य आदींचा समावेश आहे. यासाठी भटुंबरे गावातील महिला बचत गटांनी पुढाकार घेत भोजन वाटप करण्यासाठी सहभाग नोंदवला. सदर कार्यक्रम प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक फंची राम शिंदे,माजी सरपंच भारत शेंबडे, तंटामुक्ती अध्यक्ष भीमराव शिंदे,माजी सरपंच शिवाजी तावस्कर,विद्यमान सरपंच मंदाबाई ढवळे,सुनिता खांडेकर,नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष अजय नाना खांडेकर,उत्तम जाधव, राणूबाई वाघमारे, बाळासाहेब डांगे,भीमराव जगताप,सीमाताई वाघमारे, अर्चना बळवंतराव, गणेश ढवळे, संतोष तावस्कर, अर्जुन लोखंडे, पोलीस पाटील अनिल पाखरे, आदीसह बचत गटातील सर्व ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

बातमी व जाहिरात साठी संपर्क-               दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close