येणारी निवडणूक हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असेल – सुशीलकुमार शिंदे
काँग्रेसच्या काळातील विकास कामाचे श्रेय भाजप सरकार घेत आहे

संपादक-दिनेश खंडेलवाल
येणारी निवडणूक हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असेल – सुशीलकुमार शिंदे
काँग्रेसच्या काळातील विकास कामाचे श्रेय भाजप सरकार घेत आहे
पंढरपूर :- मोदींनी जनतेला दिलेली गॅरंटी ही फसवी असून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा चारशे पार नाहीतर तडीपार होईल. सध्याची निवडणूक ही हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची असून लोकशाही टिकवायची असेल तर सर्व धर्मसमभावाप्रमाणे एकसंघ राहून काँग्रेसच्या विकास आघाडीला मतदान करावे. सत्तेवर जर पुन्हा भाजप आली तर लोकशाही संपून दंडेल शाही येईल जनतेला लोकशाही टिकवणारे सरकार पाहिजे का हुकूमशाही टिकवणारे सरकार पाहिजे हे ठरवण्याची वेळ आली आहे. अशी प्रतिक्रिया केंद्रीय माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी पंढरपूर येथील संत तनपुरे महाराज मठात घेतलेल्या संकल्प सभेत व्यक्त केली.
काँग्रेसच्या हाती हात धरू संकल्प विजयाचा करू या संकल्प सभा सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुरू आहेत. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना म्हणाले की काँग्रेसच्या काळात तिन्ही राज्याला जोडणारे महामार्ग
म्हणजेच सोलापूर पुणे, सोलापूर बेळगाव, सोलापूर हैदराबाद या रस्त्याचा विकास केला काँग्रेसच्या राजवटीमध्ये सुरू केलेल्या या विकास कामाचे श्रेय सध्याचे भाजप सरकार आज घेत आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या सरकारने एनटीपीसी हा प्रकल्प आणला त्याचवेळी सोलापूर विमानतळ मंजूर केले मात्र सध्याच्या भाजप सरकारने पाठपुरावा होऊ दिला नाही व विमानतळ अजूनही प्रतीक्षेतच आहे. राज्यात शेतकरी सुखात नाही आत्महत्या अजूनही सुरूच आहेत. महागाई वाढलेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. खर्च जास्त आणि दर कमी अशी परिस्थिती शेतकऱ्यांची असल्यानेच हे सरकार लोकशाही नसून हुकुमशाही आहे. यासाठी जनतेने सध्याच्या सरकारला घरी बसवण्याचे काम करावे कारण हे सरकार फक्त आश्वासन देत राहते. ही निवडणूक शेवटची असेल याचा भानही आपल्याला असायला पाहिजे व उद्याच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सर्वधर्मसमभाव मानणारी आपली राज्य प्रणाली असून देखील आज देशांमध्ये जाती-जातीमध्ये, धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. हे आपल्या देशाच्या हिताचे नाही. आपला देश सर्वधर्मसमभाव मानणारा आहे. ही परंपरा कायम राखायची आहे.
आता जनतेने विचार करून मतदान करावे. या येत्या निवडणुकीनंतर भाजपा विजयी झाली तर लोकशाही जाऊन हुकूमशाही येईल अशी प्रतिक्रिया केंद्रीय माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची चेअरमन अभिजीत आबा पाटील, चेतन नरोटे, सु.रा. परिचारक पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, काँग्रेसचे जुने नेते बजरंग बागल, मंगळवेढ्याचे तालुकाध्यक्ष नंदकुमार पवार, आम आदमी पार्टीचे एम पाटील, काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष राहुल पाटील तसेच समीर कोळी, बाळासाहेब आसबे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.