ईतर

सरकारने आमच्या मागण्या मान्य करूनच पंढरीत यावे- चेअरमन अभिजीत पाटील

विविध मागण्या मान्य करण्यासाठी सर्वांनी मिळून सरकारला भाग पाडण्याचा एल्गार

संपादक-दिनेश खंडेलवाल

सरकारने आमच्या मागण्या मान्य करूनच पंढरीत यावे- चेअरमन अभिजीत पाटील

विविध मागण्या मान्य करण्यासाठी सर्वांनी मिळून सरकारला भाग पाडण्याचा एल्गार

पंढरपूर : पंढरपूर शहर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी दिल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला होता. नागरिकांना तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असून शेतातील उभी पिकेही पाण्याअभावी जळू लागली असल्याने शासनाकडे पाणी सोडण्यासाठी विनंती करूनही शासन दुर्लक्ष करीत आहे. यासाठी आज विठ्ठल चे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्ष संघटनेने एकत्र येत आक्रोश मोर्चा काढला. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा समारोप पंढरपूर येथे दिनांक १० सप्टेंबर रोजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार असून सदर कार्यक्रमाला येताना जनतेची कामे मार्गी लावूनच आपल्या दारी यावे अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि विविध घटक यांच्या विविध प्रश्नाची सोडवणूक शासनाने करावी यासाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा सर्वपक्षीय आणि विविध संघटनेचे वतीने तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात खालील मागण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये पंढरपूर, मंगळवेढा तसेच सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा. उजनी धरणातून भीमा नदी उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडावे. वीर धरणातून पाणी सोडून सोनके तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात यावा तसेच टेल टू हेड पाणी मिळावे. चारा डेपो सुरू करून जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा. दुधाला विना कपात ३८ रुपये दर द्यावा. शिक्षण व नोकरीमध्ये मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावे. जालना येथील मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकावर झालेल्या लाठी चार्जची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व त्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे.

हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय येथे मोठ्या संख्येने जनसमुदायाच्या उपस्थित काढण्यात आला. मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. यावेळी चेअरमन अभिजीत पाटील यांनी आपल्या भाषणात वरील मागण्या मांडत सरकारला या मागण्या मान्य करण्यासाठी सर्वांनी मिळून भाग पाडू असे सांगितले. येत्या १० तारखेला शासन आपल्या दारी येत आहे. त्यामधे जनतेची कामे मार्गी लावूनच आपल्या दारी यावे अशीही मागणी केली.

यावेळी स्वेरी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष बी.पी.रोंगेसर, काँग्रेस पक्षाचे मा.जिल्हाध्यक्ष देवानंद गुंड पाटील, ज्येष्ठ विष्णूभाऊ बागल, पांडूरंग कारखान्याचे मा.व्हा चेअरमन आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कौलगे, बिभिषन पवार, शशिकांत पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, काँग्रेस पक्षाचे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे, शिवसेना ठाकरे गटाचे रणजीत बागल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप मांडवे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन आटकळे, राष्ट्रवादी मंगळवेढा तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, मुझमिल काझी, राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष शुभांगी जाधव, राजश्री ताड, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक यांसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट
[आता चेअरमन काळे यांच्या घरावरही काढावा लागेल मोर्चा………….

विविध प्रश्नासाठी श्री विठ्ठलचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तहसिलवर मोर्चा काढण्यात आला आहे.यावेळी अनेकांची भाषणे झाली. यामध्ये सहकार शिरोमणीचे माजी संचालक ॲड.दिपक पवार यांनी आपल्या भाषणात एवढ्या दिवसात बिले न दिलेल्या चेअरमन कल्याणराव काळे यांच्या घरावरही आता आपणाला लवकरच यापुढील काळात मोर्चा काढावा लागेल. असे सांगत, त्या सहकार शिरोमणी चे थकीत बिलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
ॲड. दिपक पवार]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close