जीएसटी च्या रकमेबाबत सभासदांची दिशाभूल करू नका-अमरजित पाटील
३ कोटी ३८ लाख रुपयेचा दंड कारखान्याला का झाला!

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : जी एस टी च्या रक्कमेबाबत भगिरथ भालके हे सभासद शेतकर्यांची दिशाभुल करित आहेत. जी.एस.टीची रक्कम व्यापार्यांनी कारखान्यांकडे भरणा केलेली असताना सदर रक्कम कारखान्याने जी.एस.टी विभागाकडे भरली नाही. त्यामुळे सुमारे ३ कोटी ३८ लाख रुपयेचा दंड कारखान्याला झालेला आहे. ही रक्कम भगिरथ भालकेंच्या खाजगी प्रोप्रर्टी मधून गेलेली नाही. तर सर्वसामान्य सभासद शेतकर्यांचा हक्काच्या पैशातून गेलेली आहे.
तसेच जी.एस.टी भरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे टप्पे पाडून मागितले हे भगिरथ भालकेंचे सांगणे सुद्धा खोटारडेपणाचे आहे. कारण जी.एस.टीचा मुद्दा हा केंद्र सरकारशी निगडीत आहे. राज्य सरकारशी नाही. ज्या सभासद – कामगारांचा खोटा कळवळा भगिरथ भालके दाखवून रडत आहेत. त्या कामगारांचा प्रोव्हिडंट फंड ही पगारातून कपात करुन फंड ऑफिसला भरलेला नाही. ती ही रक्कम कोटीच्या घरात आहे.
या मुद्द्यावर भगिरथ भालके यांना आम्ही जाहीर खुल्या चर्चेचे आव्हान देत आहोत. ठिकाण,वेळ,तारीख त्यांनी ठरवावी ! उगाच चर्चेपासून पळ काढू नये. कारण तुमच्या खानदानाचा पळून जाण्याचा इतिहास सगळ्या तालुक्याला चांगलाच माहिती आहे. असा खरपूस समाचार कर्मवीर औदुंबर आण्णा प्रतिष्ठानचे संस्थापक अमरजित पाटील यांनी प्रचार सभेत घेतला.