ईतर

कारखान्याचा म्होरक्या बदलण्यासाठी सभासद बंधूंनी साथ द्यावी-युवराज पाटील

कारखाना वाचवण्यासाठी स्वतः शर्तीचे प्रयत्न केले

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सत्ता योग्य आणि आपल्या माणसाच्या हातात दिल्यास कामगारांचे अडचणी सुटून शेतकरी सभासदांना न्याय मिळेल अशी भूमिका युवराज पाटील यांनी व्यक्त केली.

अकरा ते बारा वर्षे विठ्ठल कारखान्याच्या सत्तेत होतो. कारखान्यास रसातळाला नेण्याचे काम चेअरमन भालके यांनी केले आहे. कारखाना सुरू होण्यासाठी आपणही जोराचे प्रयत्न केले. सत्ताधार्‍यांचे पाय मात्र नेहमीच मागे पडले. यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनाही भेटलो. त्यांनीच सांगितलं म्होरक्या बदला कारखाना आपोआप सुरू होईल. कारखान्याचा म्होरक्या बदलण्याची
ताकद फक्त शेतकरी सभासदांमध्येच आहे. यामुळे सभासदांनी जागरूक राहून हे काम करावे असे मत पाटील यांनी उंबरे येथील प्रचार सभेत केले.

विठ्ठलच्या निवडणुकीची रंगत वरचेवर वाढतच चालली आहे. युवराज पाटील यांच्या पॅनलने या प्रचारात आघाडी घेतली आहे. सोमवारी कान्हापुरी, जळोली, उंबरे ,करोळे, देवडे, खेडभोसे आणि गादेगांव इत्यादी गावात प्रचारसभा झडल्या. या प्रचार सभांमधून युवराज पाटील यांनी सभासदांना विठ्ठल कारखान्याची अवस्था काय झाली आहे ? हे समजावून सांगितले. नेतृत्व बदलल्याशिवाय कारखान्याची प्रगती अशक्य असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी त्यांच्या समवेत विठ्ठलचे माजी संचालक विठ्ठल दगडे, आप्पासाहेब पाटील, भीमराव रोडगे, जीवराज चव्हाण आदींसह करकंब परिसरातील अनेक सभासद मान्यवर उपस्थित होते. कारखान्याची अवस्था संचालक असूनही सुधारता येत नाही, कै. औदुंबर अण्णांनी लावलेले हे रोपटे पराधीन होत असल्याची भावना झाल्यानेच , आपण स्वतः हा कारखाना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अवघे पावणेसहा कोटी रुपये भरले असते तर कारखाना मागेच सुरू झाला असता, परंतु प्रस्तापित चेअरमनला ती गोष्ट करावयाची नव्हती. यावर शेवटचा उपाय म्हणून राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनाही भेटलो. त्यांनीच सांगितलं मोरक्या बदला. कारखान्याचा म्होरक्या बदलण्याची जबाबदारी सभासदांवर असते, याकरिताच आपणासमोर उभे असल्याची भूमिका युवराज पाटील यांनी व्यक्त केली.

ही निवडणूक जिंकल्यानंतर प्रथम ऊसतोडणीदार, वाहतूकदार, कामगार आणि शेतकरी सभासदांची थकीत बिले एका महिन्याच्या आत देण्याची व्यवस्था करण्यात येईल असे सांगून सभासदांनी आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे मत युवराज पाटील यांनी व्यक्त केले.

[सत्ताधाऱ्यांनी विठ्ठल कारखाना कर्जबाजारी केला आहे. मागील काळात यामुळेच तो सुरू होऊ शकला नाही. या कारखान्यास कर्जाच्या गर्तेतून बाहेर काढायचे आहे. याकरिता सभासदांनी मतदानरुपी आशीर्वाद द्यावा अशी विनंती युवराज पाटील यांनी उंबरे येथील जाहीर प्रचार सभेत केली]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close