फडणवीसांनी संपर्क केला नाही;आता निवडणूक जनतेच्या हातात गेली– जयसिंह मोहिते पाटील
धैर्यशील मोहिते पाटील १४ एप्रिल राष्ट्रवादीत प्रवेश अन् १६ एप्रिल उमेदवारी अर्ज भरणार

संपादक : दिनेश खंडेलवाल
फडणवीसांनी संपर्क केला नाही;आता निवडणूक जनतेच्या हातात गेली– जयसिंह मोहिते पाटील
धैर्यशील मोहिते पाटील १४ एप्रिल राष्ट्रवादीत प्रवेश अन् १६ एप्रिल उमेदवारी अर्ज भरणार
पंढरपूर :- माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजकीय उद्रेक झाला. अकलुजच्या मोहिते-पाटील आणि फलटणच्या रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या कुटुंबाने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोधात दर्शवला होता. परंतु भाजपाने कोणताही संपर्क न केल्याने अखेर माढा मतदारसंघातील मतदारांची कार्यकर्त्यांची नेते मंडळींच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या आग्रहाखातर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्राथमिक प्रवेश करत तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहित धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता धैर्यशील मोहिते-पाटील ‘तुतारी’चे उमेदवार असल्याने महायुतीच्या अडचणीत वाढ होणार आहे.
१४ एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश करणार असून १६ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ते माढा मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. अशी माहिती जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
जयसिंह मोहिते पाटील म्हणाले सोलापूर जिल्ह्यातील त्याचप्रमाणे माळशिरस तालुका माढा तालुका व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील आमच्या पाच ते सहा हजार कार्यकर्ते भाजपचा राजीनामा देतील. जेष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे देखील ज्यावेळी शरदचंद्र पवार हे माळशिरस तालुक्यात येतील त्यावेळी त्यांच्या उपस्थितीमध्ये ते राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये अतिशय चुरशीशी निवडणूक होणार आहे.
असेही जयसिंह मोहिते पाटील म्हणाले
मोहिते पाटील परिवाराचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश निश्चित झाल्यामुळे भाजपाचे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचे धाबे दणाणल्याचे दिसत आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व नेत्यांच्या आग्रहास्तवच ही निवडणूक लढवत आहोत. सर्वच कार्यकर्ते नेते मंडळींनी शरदचंद्र पवार गटाच्या तुतारीवर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. मात्र ही निवडणूक आता आमच्या हातात राहिली नाही. आता ही निवडणूक जनतेच्या हातात गेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच सांगितले असते की तुम्ही थांबा तर आम्ही थांबलो असतो मात्र आता कार्यकर्ते थांबणार नाहीत ते शरद पवारांच्या मागेच उभारणार आहे. त्यांच्याविषयी मतदारांच्या मनात सहानुभूती आहे.
आम्ही जनतेच्या जीवावर राजकारण करतो ईडीची आम्हाला भीती नाही कारण आमचे सर्व व्यवहार पारदर्शक आहेत. त्यामुळे आम्हाला भीती नाही. तरीही भाजपने ईडीची कारवाई केली तर मतदान वाढणार हे मात्र नक्की आहे. या लोकसभेमध्ये सोलापूर, माढा, बारामती मतदारसंघातून वेगळे चित्र पहायला मिळणार असून तिन्ही ठिकाणी भाजपच्या उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही असे भाकीत ही जयसिंह मोहिते पाटील यांनी केले.
शेतकऱ्यातून प्रचंड रोश दिसत असून शेतकरी भाजप विरोधात आहे. खताचे दर वाढले, शेतीमालाला भाव नाही याचा फटका भाजपला बसणार आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश आणि उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.