राज्य

लक्ष्मी टाकळी ग्रामस्थांची दारूबंदीची मागणी;विशेष ग्रामसभेत बहुमतांनी ठराव पारित

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

संपादक – दिनेश खंडेलवाल 

लक्ष्मी टाकळी ग्रामस्थांची दारूबंदीची मागणी;विशेष ग्रामसभेत बहुमतांनी ठराव पारित

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

पंढरपूर(प्रतिनिधी):- दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याचे पाहायला मिळते. दारूबंदीसाठी महिला नेहमी आग्रही असतात. लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतकडेही महिलांसह नागरिकांनी दारूबंदीसाठी ठराव करण्याची मागणी केली. पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत तिने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना वाढदिवसाची भेट म्हणून विशेष ग्रामसभेचे आयोजन करून गाव आणि उपनगर भागात असलेल्या दारू, ताडी, हातभट्टी पूर्णपणे बंद करण्यासाठी आज विशेष ग्रामसभा घेतली यामध्ये महिलांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बहुमताने पाठिंबा दर्शविला व ठराव पारित केला.

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने हद्दीतील अवैद्य दारू विक्री व दारू दुकाने, ताडी विक्री कायमची बंदर करण्याबाबत विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम म्हणून सरपंच संजय साठे यांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदीचा ठराव मांडण्यात आला होता.

या ठरावाला उपस्थित सर्व ग्रामस्थांनी हात वर करून ठरावाच्या बाजूने मतदान केले तर ठरावाच्या विरोधात एकही मतदान न झाल्याने सदरचा ठराव एकमताने मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच संजय साठे, उपसरपंच सौ.रुपाली कारंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास ढोणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य,लोकसभा संपर्कप्रमुख महेश (नाना) साठे, तंटामुक्त अध्यक्ष संभाजी कदम, सुरेश टीकोरे, आबासो पवार, विलास देठे सर, पोलीस पाटील इरकल मॅडम, ग्रामपंचायत सदस्य औदुंबर ढोणे, समाधान देठे, गोवर्धन देठे, सागर सोनवणे, आशाबाई देवकते, विजयमाला वाळके, नंदकुमार वाघमारे, माजी उपसरपंच सचिन वाळके, अनिल सोनवणे, महादेव पवार, ग्राम विकास अधिकारी जयवंत खंडागळे तसेच नंदकुमार दुपडे यांच्यासह लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये मनुष्यवस्तीत दारू विक्री केली जात असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थांकडून करण्यात आल्या होत्या.
याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन सरपंच संजय साठे यांनी दारूबंदीचा धाडसी निर्णय घेत “दारूवर टाकू बहिष्कार व्यसनमुक्तीचा करू पुरस्कार” हे ब्रीदवाक्य घेऊन लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतने विशेष ग्रामसभेचे आयोजन अण्णाभाऊ साठे प्रशाले समोर केले होते.

यावेळी दारूबंदी बाबत ठराव मांडल्यानंतर उपस्थित सर्व ग्रामस्थांनी हात वर करून दारूबंदी करण्याबाबत मतदान केले.
सदर ठरावाच्या विरोधात एक हि मतदान न झाल्याने सदरचा ठराव बिनविरोध बहुमताने संमत करण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी जयवंत खंडागळे यांनी जाहीर केले.
या विशेष ग्रामसभेनंतर सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.

[ कायद्याच्या अनेक त्रुटी व अडचणीवर मात करीत ठराव पारित – सरपंच संजय साठे

गेल्या ४०-५० वर्षापासून लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत अंतर्गत असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न होत होतो. आम्ही देखील गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून ग्रामस्थ नागरिकांच्या मागणीनुसार दारूबंदीसाठी प्रयत्न करतोय. पण आपल्या कायद्यामध्ये एखादी गोष्ट सुरू करणे सोपे असते मात्र बंद करणे अवघड होते. कायद्याच्या अनेक टेक्निकल त्रुटीमध्ये अडचणी आल्या, त्या सर्वाचा पाठपुरावा करण्यामध्ये आठ महिन्याचा कालावधी लागला अखेर त्याची सांगता आज विशेष दारूबंदी ग्रामसभेने झाली. यावेळी लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत येथील रहिवासी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ठरावाला पाठिंबा दिल्याने शंभर टक्के ठराव पारित झाला, उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. ]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close