राजकिय

विकास कामाच्या जोरावर विजय निश्चित – समाधान आवताडे

यंदा गुलाल महायुतीचाच;विरोधकांच्या नरेटीव्हला मतदार बळी पडणार नाही!

संपादक – दिनेश खंडेलवाल 

विकास कामाच्या जोरावर विजय निश्चित – समाधान आवताडे

यंदा गुलाल महायुतीचाच;विरोधकांच्या नरेटीव्हला मतदार बळी पडणार नाही!

पंढरपूर(प्रतिनिधी):- येणाऱ्या २३ तारखेला भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या उमेदवाराचा शंभर टक्के गुलाल राहणार असून विकास कामाच्या जोरावर ही निवडणूक जिंकण्याची खात्री आहे. पोटनिवडणुकीमध्ये तीन हजार नऊशे मतांनी त्या ठिकाणी विजय झाला होता. परंतु या निवडणुकीमध्ये ३७ हजार ते ३९ हजारांनी विजयाची खात्री आहे. भाजप तसेच सर्व वरिष्ठ नेते मंडळींनी माझ्यावर विश्वास टाकून मला उमेदवारी जाहीर केली. त्यांचा विश्वास सार्थ ठरवणार अशी प्रतिक्रिया समाधान दादा अवताडे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केली.

२५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे यांनी भारतीय जनता पार्टी पक्षातून महायुतीचे उमेदवार म्हणून दोन अर्ज दाखल केले. यावेळी त्यांच्यासोबत उमेश परिचारक माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की निवडणूक म्हटले की आव्हान वगैरे या सगळ्या गोष्टी होत असतात. परंतु विकास कामाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढवतोय. जनतेची मतदारांची शेतकऱ्यांची माता-भगिनींची सर्वांची साथ लाभत आहे. मतदार संघात अनेक योजना राबविल्या मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न पंढरपूर एमआयडीसी चा प्रश्न सोडवण्यात यश आले. अनेक विकास कामे केली आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवून तेथे नंदनवन फुलले पाहिजे त्याचबरोबर पंढरी ही अध्यात्मिक नगरी असून भविष्यात ही उद्योगाची नगरी म्हणून ओळखली जाईल. यासाठी माझ्यासोबत महायुतीचे तसेच भाजप व पांडुरंग परिवार असे सर्व मिळून चांगल्या पद्धतीने निवडणुकीत कामे करणार आहोत. विरोधकांच्या नरेटीव्हला मतदार पडणार नाहीत अशी खात्री समाधान आवताडे यांनी व्यक्त केली.

[ विकास कामाच्या जोरावर विजय खेचून आणणार…..

महायुतीच्या सरकारमध्ये अनेक महत्त्वपूर्ण योजना झालेल्या आहेत. ४८ हजार शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले, लाडकी बहीण योजना, एसटी बस मध्ये महिलांना अर्धे तिकीट, शिवाय पाणी, रस्ते, बेरोजगार कमी करणे असे अनेक प्रश्न सोडवले आहेत. पुढील पाच वर्षात या मतदारसंघातील एकही काम शिल्लक ठेवणार नाही. आज विरोधकाकडे कुठलाही व्हिजन नाही ते खोटी टिकाटिपन्नी करून खोटा नरेटिव्ह सांगून निवडणूक लढवणार आहेत. मात्र याला या मतदारसंघातील मतदार बळी पडणार नाहीत. विकास कामाच्या जोरावर या निवडणुकीत विजय खेचून आणणार अशी खात्री समाधान दादा अवताडे यांनी व्यक्त केली. ]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close