दुःखाचे डोंगर असताना सभासदांचे पैसे मिळवण्यासाठी नेते मंडळींकडे पाठपुरावा केला- भगीरथ भालके
काहीजण प्रचारसभेत कामगारांचे शेतकऱ्यांचे पैसे देत नसल्याचे सांगत आहेत!

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारा दरम्यान युवा नेते श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके हे बोलत होते.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात आज कोर्टी, तिसंगी, सोनके, गार्डी, बोहाळी खर्डी, तप. शेटफळ आदी भागात प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी भगीरथ भालके म्हणाले की, कै.आमदार भारतनाना भालके यांच्या निधना नंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा याकरिता नानांच्या 5 व्या मासिकासाठी मला सरकोली येथे येता आले नाही. कुटुंबावर दुःखाचा डोंगर असताना माझे कुटुंबासह नातेवाईकांची भेट घेता आली नाही याचे मला दुःख होत आहे. कुटुंबापासून कधी 15 दिवस, कधी महिना, कधी 2 महिने दूर होतो. सभसदांचे पैसे मिळवण्यासाठी माजी केंदीय कृषीमंत्री शरद पवार , उपमुख्यमंत्री अजित पवार , जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे कायम पाठपुरावा केला, परंतु माझे सहकारी असलेले संचालक युवराज पाटील यांनी साखर आयुक्त, वित्तीय बँका, साखर व्यापारी यांना चुकीची माहिती देवून कारखाना अडचणीत आणण्याचे काम केले. तेच युवराज पाटील आज आपल्यासमोर गावोगावी प्रचार सभेत शेतकऱ्यांचे पैसे, कामगारांचे पैसे न देण्याचा आरोप करीत आहेत असे चेअरमन भगीरथ भालके म्हणाले.
यावेळी संचालक समाधान काळे,मनसे नेते दिलीप धोत्रे तसेच दोन्ही कारखान्याचे आजी-माजी संचालक सर्वश्री भालचंद्र मोरे, माजी नगरसेवक अमित डोंबे, शशिकांत पाटील, गोकुळ जाधव, दत्तात्रय पाटील, द्रोणाचार्य हाके, शशिकांत बागल, भारत कोळेकर, दत्तात्रय खरात, बाबा हाके, धोंडीबा वाघमारे, बापूसाहेब गायकवाड, अनिल वाघमोडे, सिद्धेश्वर मोरे, मधुकर मोरे, सुदाम मोरे, महादेव देठे, परमेश्वर देठे, धनाजी घाडगे, नेताजी सावंत, शालिवाहन कोळेकर, भास्कर मोरे, नारायण शिंदे यांचेसह श्री विठ्ठल कारखान्याचे सभासद कार्यकर्ते उपस्थित होते.